जन्म: १५ ऑगस्ट १९२२. पन्हाळा जवळ जेऊर येथे.
कार्यक्षेत्र: पैजारवाडी.
गुरु: गराडे महाराज. पुढे सिद्धेश्वर महाराज.
विशेष प्रभाव: शंकर महाराज धनकवडी (याना ते दादा म्हणजे मोठे बंधू मानीत).

प. पू. चिले महाराजांचा जन्म १५ आगस्ट १९२२ ला आजोबा श्री बु-हाण यांचेकडे पन्हाळ्याजवळच्या जेऊर गावी झाला. त्यांचे तिर्थरूप कोल्हापूरला व्यवसायानिमित्त स्थलांतरीत झाले असले तरी त्यांचे गाव पैजारवाडी हे होय. त्यांचे बालपण त्यांच्या गावी पैजारवाडी येथेच गेले. त्यांच्या बालपणी ते अनवाणी वा-याच्या वेगाने पळत असत. पहाणारे अचंबित होत असत. त्यांना भैरवनाथ मंदीर, मसाईमंदीर, टेबलाईमातामंदीर व सिध्देश्वर मंदीरात जाण्यात व तेथेच वेळ घालवण्यात जास्त आवडत असे.

चिले महाराजांची कर्मभुमी पुणे, पण त्यांची समाधी मात्र रत्नागिरी कोल्हापुर रस्त्यावर पैजारवाडी या लहानशा गावात आहे. त्यांचा जन्मदेखील पैजारवाडी येथेच झाला. पण जन्मानंतर थोड्याच दिवसात त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर ते आपल्या वडिलांसोबत कोल्हापूर येथे मुक्कामी राहीले. सुकुमार वयात त्यांच्या वडीलांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांनी शाळा सोडून भ्रमंती केली. त्यांना काही काळ अन्नपाण्याशिवाय काढला. कधी कधी दहा ते बारा दिवस उपवास घडत असे. त्याही अवस्थेत त्यांनी भ्रमंती सुरुच ठेवली. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची गुढता असे. ते लोकांना ब्रम्ह म्हणजे काय? हे समजावून सांगत. कधी कधी "मीच ब्रम्ह आहे" किंवा "मीच दत्त महाराज आहे" असे लोकांना सांगत.

धनकवडीचे अवलिया संत श्री शंकर महाराज यांना तर ते आपले थोरले बंधू (दादा) मानीत. त्यांची वागणूक पेहराव अत्यंत साधी असे. त्यांनी त्यांच्या श्रीमंतीचा समृध्दीचा देखावा कधीच केला नाही. भक्त लोक तसेच परिचितजन नेहमीच अचंबित होत असत. ते अत्यंत माफक पण अतिशय मुद्देसूद बोलत असत. ते एकाशी बोलत पण इतरांना संदेश मिळत असे. सदगुरूंनी त्यास कृपांकित करून त्यांचे जीवन परिपूर्ण केले.

श्री चिले महाराज हे दत्तावतारी सत्पुरूष. त्यांनी अवतार काळात कोल्हापूर सातारा नाशिक येथे विशेष संचार केला व भक्तांना मार्गदर्शन केले.

१९८५-१९८६ च्या दरम्यान पैजारवाडी येथे समाधिस्थ झाले.

हे स्थान पन्हाळ्याच्या पायथ्याशी कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर आहे. त्यांची कासव या प्राण्यावर विशेष प्रिती होती म्हणून कासवाच्याच आकाराचे समाधी मंदीराचे बांधकाम केलेले आहे.

श्री स्वामी सखा यांनी चिले महाराज यांना गुरू मानून त्यांची सेवा केली.